‘गृहपाठ नको रे बाबा’ हा निर्णय मुलांच्या डोक्याचे ‘खोके’ करणारा ठरेल… नियमित गृहपाठ, ही मुलांच्या भविष्यातील गुंतवणूक मानली पाहिजे
शिक्षण समाज घडवणारे असावे, ते समाजाला हानी पोहचवणारे नसावे. आधीच आठवीपर्यंत सर्व पास, सोपा अभ्यासक्रम, टक्केवारीची खिरापत, त्यात आता गृहपाठ बंद… हे असे निर्णय राबवल्याने उद्याची सशक्त पिढी घडवता येईल का, याचा सरकारमध्ये बसलेले उच्च पदस्थ अधिकारी व मंत्री या सर्वांनी विचार करायला हवा.......